''सातपाटील कुलवृत्तांत आकलन आणि आस्वाद ''
॥ १ ॥
प्रास्ताविक : -
सातपाटील कुलवृत्तांत ही रंगनाथ पठारे यांची कादंबरी आहे. ही कादंबरी केवळ सातपाटील घराण्याचा कुलवृत्तांत सांगत नाही तर बारावे शतक ते आजचा काळ या प्रदीर्घ काळाचा विविधांगी शोध प्रस्तुत कादंबरीत घेतला आहे. इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारण, तत्वज्ञान, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र, भाषाशास्त्र, भूगोल, सांस्कृतिक विश्व, अध्यात्म या सर्वांना स्पर्श करणारी अभिजात कलाकृती म्हणजे सातपाटील कुलवृत्तांत ही कादंबरी होय. बारावे शतक ते एकविसाव्या शतकाच्या प्रदीर्घ काळाच्या अवकाशात या कादंबरीचे कथानक आकार घेते. या कादंबरीला एकूण सात नायक आहेत. या सात नायकांपेक्षा यातील नायिका कादंबरीत महत्त्वाच्या ठरतात. कादंबरीत लौकिक नायक -नायिकांच्या चित्रणापेक्षा माणसाच्या जगण्यातील सत्व, वृत्ती- प्रवृत्तींचा यथार्थ अवलोकन करणारी अशी ही कादंबरी आहे. काळ बदलतो. माणसं बदलतात. परंतु जीवनातील सुखदुःखे बदलत नाहीत. माणसांच्या जगण्यातील शाश्वत मूल्यधरणांचा तटस्थ शोध प्रस्तुत कादंबरी घेते. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या कारणांसाठी संघर्ष होतो. या संघर्षात माणसाच्या मूळ प्रवृत्ती उघड्या पडतात. या प्रवृत्तींची मूळ कहानी म्हणजे ही कादंबरी होय.
भूतकाळाचे प्रत्येकाला अकर्षण असते. आज आपण जे काही आहोत त्या असण्याचा अर्थ लावण्यासाठी माणूस भूतकाळात डोकावत असतो. कुटुंब, समाज, राज्य, देश, पृथ्वी अवकाश या सर्वांच्या आकलनासाठी भूतकाळ महत्त्वाचा ठरतो. भूतकाळात डोकावण्याचे विविध प्रवृत्ती असतात. त्यापैकी पहिली प्रवृत्ती म्हणजे आज आपण मागासलेले ,कमकुवत, गरीब आहोत? या दृष्टीने आपण भूतकाळात डोकावून पाहतो. दुसरी प्रवृत्ती आज आपण फार प्रतिष्ठित,श्रीमंत,अभिमानी आहोत. परंतु आपला भूतकाळ कसा होता? याची शोध घेण्याची प्रवृत्ती असते. एकूण माणसाच्या आजच्या अवस्थेचा, वागण्याचा, मूल्यांचा अर्थ लावण्यासाठी संपूर्ण समाजाचा भूतकाळ तटस्थपणे वस्तुनिष्ठपणे शोधणे महत्त्वाचे असते. सातपाटील कुलवृत्तांतमध्ये लेखक रंगनाथ पठारे भावनिक न होता जीवनाचा शाश्वत संपूर्ण अर्थ लावतात. एक माणूस म्हणून ,समाज म्हणून, आपण कसे उत्क्रांत झालो? याची मांडणी म्हणजे प्रस्तुत कादंबरी होय. भूतकाळाबद्दल माणूस हळवा होतो. भावनाशील होतो. त्यातून भूतकाळाचे सोयीचे अर्थ लावण्याची प्रवृत्ती दिसते. ही प्रवृत्ती रंगनाथ पठारे यांनी टाळली आहे. स्वतःच्या अहंकाराला, अस्मितांना बळ पुरवणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांना भूतकाळाचे वस्तुनिष्ठ आकलन नको असते. ते आपला भूतकाळ नाकारतात. भूतकाळाचे गौरवीकरण करून स्वतःचे मोठेपण सिद्ध करणाऱ्या प्रवृत्ती आपल्या आजूबाजूला असतात. भूतकाळाचा सोयीचा अर्थ लावणारे अनेक आपल्याला समाजात दिसतात. या प्रवृत्तींना टाळून आपल्या भूतकाळातील सत्य प्रकाशित करणारी कलाकृती म्हणून आपल्याला सातपाटील कुलवृत्तांतकडे पाहता येते.
॥ २ ॥
सातपाटील कुलवृत्तांतचे आशयविश्व :
॥ १ ॥
प्रास्ताविक : -
सातपाटील कुलवृत्तांत ही रंगनाथ पठारे यांची कादंबरी आहे. ही कादंबरी केवळ सातपाटील घराण्याचा कुलवृत्तांत सांगत नाही तर बारावे शतक ते आजचा काळ या प्रदीर्घ काळाचा विविधांगी शोध प्रस्तुत कादंबरीत घेतला आहे. इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारण, तत्वज्ञान, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र, भाषाशास्त्र, भूगोल, सांस्कृतिक विश्व, अध्यात्म या सर्वांना स्पर्श करणारी अभिजात कलाकृती म्हणजे सातपाटील कुलवृत्तांत ही कादंबरी होय. बारावे शतक ते एकविसाव्या शतकाच्या प्रदीर्घ काळाच्या अवकाशात या कादंबरीचे कथानक आकार घेते. या कादंबरीला एकूण सात नायक आहेत. या सात नायकांपेक्षा यातील नायिका कादंबरीत महत्त्वाच्या ठरतात. कादंबरीत लौकिक नायक -नायिकांच्या चित्रणापेक्षा माणसाच्या जगण्यातील सत्व, वृत्ती- प्रवृत्तींचा यथार्थ अवलोकन करणारी अशी ही कादंबरी आहे. काळ बदलतो. माणसं बदलतात. परंतु जीवनातील सुखदुःखे बदलत नाहीत. माणसांच्या जगण्यातील शाश्वत मूल्यधरणांचा तटस्थ शोध प्रस्तुत कादंबरी घेते. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या कारणांसाठी संघर्ष होतो. या संघर्षात माणसाच्या मूळ प्रवृत्ती उघड्या पडतात. या प्रवृत्तींची मूळ कहानी म्हणजे ही कादंबरी होय.
भूतकाळाचे प्रत्येकाला अकर्षण असते. आज आपण जे काही आहोत त्या असण्याचा अर्थ लावण्यासाठी माणूस भूतकाळात डोकावत असतो. कुटुंब, समाज, राज्य, देश, पृथ्वी अवकाश या सर्वांच्या आकलनासाठी भूतकाळ महत्त्वाचा ठरतो. भूतकाळात डोकावण्याचे विविध प्रवृत्ती असतात. त्यापैकी पहिली प्रवृत्ती म्हणजे आज आपण मागासलेले ,कमकुवत, गरीब आहोत? या दृष्टीने आपण भूतकाळात डोकावून पाहतो. दुसरी प्रवृत्ती आज आपण फार प्रतिष्ठित,श्रीमंत,अभिमानी आहोत. परंतु आपला भूतकाळ कसा होता? याची शोध घेण्याची प्रवृत्ती असते. एकूण माणसाच्या आजच्या अवस्थेचा, वागण्याचा, मूल्यांचा अर्थ लावण्यासाठी संपूर्ण समाजाचा भूतकाळ तटस्थपणे वस्तुनिष्ठपणे शोधणे महत्त्वाचे असते. सातपाटील कुलवृत्तांतमध्ये लेखक रंगनाथ पठारे भावनिक न होता जीवनाचा शाश्वत संपूर्ण अर्थ लावतात. एक माणूस म्हणून ,समाज म्हणून, आपण कसे उत्क्रांत झालो? याची मांडणी म्हणजे प्रस्तुत कादंबरी होय. भूतकाळाबद्दल माणूस हळवा होतो. भावनाशील होतो. त्यातून भूतकाळाचे सोयीचे अर्थ लावण्याची प्रवृत्ती दिसते. ही प्रवृत्ती रंगनाथ पठारे यांनी टाळली आहे. स्वतःच्या अहंकाराला, अस्मितांना बळ पुरवणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांना भूतकाळाचे वस्तुनिष्ठ आकलन नको असते. ते आपला भूतकाळ नाकारतात. भूतकाळाचे गौरवीकरण करून स्वतःचे मोठेपण सिद्ध करणाऱ्या प्रवृत्ती आपल्या आजूबाजूला असतात. भूतकाळाचा सोयीचा अर्थ लावणारे अनेक आपल्याला समाजात दिसतात. या प्रवृत्तींना टाळून आपल्या भूतकाळातील सत्य प्रकाशित करणारी कलाकृती म्हणून आपल्याला सातपाटील कुलवृत्तांतकडे पाहता येते.
॥ २ ॥
सातपाटील कुलवृत्तांतचे आशयविश्व :
मानवी जीवन कधीही एकरेषीय असत नाही. जगण्यातील जटिलता, गुंतागुंत उलगडणारी ही कादंबरी आहे. समकालीन जगण्यातील प्रश्नांची, समस्यांची उत्तरे आपल्याला या कादंबरीतून मिळतात. मानवी जीवन कसे कसे बदलत गेले? या प्रत्येक टप्प्यांचा अर्थ शोधणारी ही कादंबरी आहे. जगण्याच्या साधनांचा अवकाश, ही साधने मिळवण्यातील संघर्ष या कादंबरीतून मांडला जातो. माणसातील प्रेम, सकारात्मकता, स्त्री-पुरुष नात्यातील ओलं,स्वार्थ, हिंसा, रक्ताच्या नात्यातले रंग, मैत्री, विश्वास या सर्वांच्या मूलभूत अस्तित्वाला मुखर करणारी ही कलाकृती आहे. जगण्यातील शौर्य, वीरता केवळ युद्धातील माणसं मारण्यात असत नाही. प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला जिवंत ठेवणे हे सुद्धा शौर्य, वीरता असते. सातपाटील कुलवृत्तांत मधील प्रत्येक नायक त्याच्या काळाच्या कसोटीवर खरा उतरलेला आहे. प्रत्येक नायकापुढे समस्या, संघर्ष वेगवेगळा आहे. त्यांनी संघर्षाला यशामध्ये परावर्तित करण्याची कला अवगत केलेली आहे. सातपाटील कुलवृत्तांत या महाकादंबरीत सात नायक, त्यांच्या अवतीभोवतीची शेकडो पात्रे या पात्रांना आकार देणारे कालातीत शेकडो प्रसंग आणि घटना यांच्या सहितत्त्व मीलनातून या कादंबरीतील आशयद्रव्य आकार घेते. विपरीत परिस्थितीतही माणसं जगण्याचा मार्ग शोधतात. माणसाच्या प्रारंभापासूनच्या जगण्यातील आदिम तत्त्व उलगडत जाणारी ही कादंबरी आहे. कुळ, वंश, जात, धर्म, प्रदेश यांच्या अस्मितांपेक्षा माणसाच्या मूलभूत गरजा त्याच्या बेगडी मूल्यांवर मात करतात. अन्न-वस्त्र-निवारा- मैथुन या मूलभूत गरजांवर माणूस स्वतःला सिद्ध करतो. म्हणूनच सातपाटील कुलवृत्तांतमधील नायक मनगटाला मनगट लागलं की बाकी फिजूल गोष्टींना झुगारून रत होतात. माणसांच्या मूलभूत प्रवृत्तीकडे स्वतःला झोकून देतात. अशा रसरसून जगणाऱ्या नायकांची ही कथा मुळातून वाचण्यासारखे आहे.
सातपाटलांच्या कुलवृत्तांतचा बिंदूतून सिंधू संस्कृतीला थेट भिडण्याचा लेखकाचा प्रयत्न वाचकाला अंतर्मुख करतो. अज्ञाताचा शोधात माणूस त्याच्या अस्तित्वापासून जगत आला आहे. देवनाथच्या अज्ञाताच्या शोधाचे प्रयोजन केवळ आपल्या कुलाचा शोध घेणे हे नाही तर माणसाच्या असण्याचे, गतीचे रहस्य शोधणे हे देवनाथच्या प्रवासाचे प्रयोजन आहे. सातपाटील कुलवृत्तांत हा केवळ पठारे घराण्याचा इतिहास नाही. महाराष्ट्रातील कुठल्याही माणसाचा कुलवृत्तांत कादंबरीतील कुलवृत्तांशी साम्य सांगणारा असू शकतो. देवनाथ आपल्या अस्तित्वाच्या मूळांशी तटस्थ सम्यक वृत्तीने पोहोचतो. या प्रवासात त्याच्या हाताला अगदी ठाम निष्कर्ष लागतात.आपला मुळ पुरुष अफगाणिस्तानातील होता. आपल्या घराण्यातील स्त्रिया या अफगाण पठाण होत्या. आरेनाबाई ,अफूबाई या अफगाण पठाण वशंच्या होत्या. त्या अस्खलित पुश्तू भाषा बोलणाऱ्या होत्या. आपल्या डीएनएमध्ये अफगाण वंश आहे. ही गोष्ट इतिहासाच्या कसोटीवर खरी ठरू शकते.याचे भान देवनाथला आहे.
आज समकालीन वास्तवात असंख्य लोक वंश,धर्म कुळी यांच्या शुद्धतेच्या गोष्टी करतात. वंश, धर्म,कुळी, जात, भाषा, परंपरा, आहार, आचारधर्म यांचा आधार घेऊन भेदभाव केला जातो. हा भेदभाव करण्यासाठीचे आधार, प्रमाणके अत्यंत दुर्दैवी, जुजबी आहेत. आपली ही मानसिकता सुद्धा आपल्याला आपल्या डीएनएतून मिळाली आहे. विशिष्ट गटाच्या शूद्र राजकारणातून आपल्या वांशिकतेच्या, कुळीच्या,जातीच्या,परंपरेच्या,आहार घेण्याच्या पद्धती,आचारधर्माचे महात्म्य सांगितले जाते. खास शहाण्णव कुळीची महात्म्य सांगणाऱ्यांना ही कादंबरी धडकन जमिनीवर आणते. मी या विश्वाच्या अवाढव्य गरगरत्या चक्रात माणूस म्हणून जन्माला आलो आहे, हेच केवळ सत्य आहे. माणूस म्हणून आपली जागा या विश्वात केवळ नगण्य अशी आहे. त्यात कसले वंश आणि कसले कुलीन असणे? जात, धर्म,वंश यांना अर्थ तो किती? देव सुद्धा आपण एका भीतीतून किंवा या विश्वाच्या अवाढव्य असण्याच्या धारणेतून कोणता तरी नियंता मानण्याच्या नजरेतून निर्माण केलेली गोष्ट होय. फार तर देव हा मानवाने निर्माण केलेला युटोपिया असू शकतो. बाकी त्याला कसा अर्थ देणार?मुळात हे विश्व फार मोठी आहे. हा शाश्वत विचार मांडणारी सातपाटील कुलवृत्तांत ही कादंबरी होय.
॥३॥
सातपाटलांच्या कुलवृत्तांतचा बिंदूतून सिंधू संस्कृतीला थेट भिडण्याचा लेखकाचा प्रयत्न वाचकाला अंतर्मुख करतो. अज्ञाताचा शोधात माणूस त्याच्या अस्तित्वापासून जगत आला आहे. देवनाथच्या अज्ञाताच्या शोधाचे प्रयोजन केवळ आपल्या कुलाचा शोध घेणे हे नाही तर माणसाच्या असण्याचे, गतीचे रहस्य शोधणे हे देवनाथच्या प्रवासाचे प्रयोजन आहे. सातपाटील कुलवृत्तांत हा केवळ पठारे घराण्याचा इतिहास नाही. महाराष्ट्रातील कुठल्याही माणसाचा कुलवृत्तांत कादंबरीतील कुलवृत्तांशी साम्य सांगणारा असू शकतो. देवनाथ आपल्या अस्तित्वाच्या मूळांशी तटस्थ सम्यक वृत्तीने पोहोचतो. या प्रवासात त्याच्या हाताला अगदी ठाम निष्कर्ष लागतात.आपला मुळ पुरुष अफगाणिस्तानातील होता. आपल्या घराण्यातील स्त्रिया या अफगाण पठाण होत्या. आरेनाबाई ,अफूबाई या अफगाण पठाण वशंच्या होत्या. त्या अस्खलित पुश्तू भाषा बोलणाऱ्या होत्या. आपल्या डीएनएमध्ये अफगाण वंश आहे. ही गोष्ट इतिहासाच्या कसोटीवर खरी ठरू शकते.याचे भान देवनाथला आहे.
आज समकालीन वास्तवात असंख्य लोक वंश,धर्म कुळी यांच्या शुद्धतेच्या गोष्टी करतात. वंश, धर्म,कुळी, जात, भाषा, परंपरा, आहार, आचारधर्म यांचा आधार घेऊन भेदभाव केला जातो. हा भेदभाव करण्यासाठीचे आधार, प्रमाणके अत्यंत दुर्दैवी, जुजबी आहेत. आपली ही मानसिकता सुद्धा आपल्याला आपल्या डीएनएतून मिळाली आहे. विशिष्ट गटाच्या शूद्र राजकारणातून आपल्या वांशिकतेच्या, कुळीच्या,जातीच्या,परंपरेच्या,आहार घेण्याच्या पद्धती,आचारधर्माचे महात्म्य सांगितले जाते. खास शहाण्णव कुळीची महात्म्य सांगणाऱ्यांना ही कादंबरी धडकन जमिनीवर आणते. मी या विश्वाच्या अवाढव्य गरगरत्या चक्रात माणूस म्हणून जन्माला आलो आहे, हेच केवळ सत्य आहे. माणूस म्हणून आपली जागा या विश्वात केवळ नगण्य अशी आहे. त्यात कसले वंश आणि कसले कुलीन असणे? जात, धर्म,वंश यांना अर्थ तो किती? देव सुद्धा आपण एका भीतीतून किंवा या विश्वाच्या अवाढव्य असण्याच्या धारणेतून कोणता तरी नियंता मानण्याच्या नजरेतून निर्माण केलेली गोष्ट होय. फार तर देव हा मानवाने निर्माण केलेला युटोपिया असू शकतो. बाकी त्याला कसा अर्थ देणार?मुळात हे विश्व फार मोठी आहे. हा शाश्वत विचार मांडणारी सातपाटील कुलवृत्तांत ही कादंबरी होय.
॥३॥
एखादी कादंबरी अभिजात कशी असते? याचा प्रत्यय सातपाटील कुलवृत्तांत या कादंबरीत येतो. आज जग कोरोना व्हायरस किंवा विषाणूने अगदी हादरून गेले आहे. मानवी जीवनाचा अर्थ सांगताना लेखक लिहितो, " पृथ्वीभोवती वातावरण आहे, म्हणजे वायूंचे आवरण आहे. या वातावरणात फक्त वायू आहेत, असे दिसत नाही. त्यात व्हायरस किंवा विषाणू सुद्धा आहेत,हे मी आधी म्हणालो आहे. अर्थात तो फक्त मी म्हणण्याचा प्रश्नच नाहीय. विषाणू पृथ्वीवरील वातावरणाचे अनभिषिक्त स्वामी असतात. आपल्यासारख्या आगुंतुकांना इथून हाकलणे हेच त्यांचे जीवितकार्य असते. आपल्या मरणानिशी ते संपते. वातावरणातील या असंख्या आणि अजरामर जिवंत/ मृत विषणूशी संघर्ष हेच आपले जीवन असते. विषाणू समजा कितीही मेले असे मानले तरी आणखी पद्मावधी जिवंत असताच.माणसांसकट सारे सजीव त्यांच्या दुनियेत जगत असतात. ही दुनिया त्यांची आहे. तिथे कोणत्या जाती, धर्म, वंश आणि त्यांच्या अरण्यांच्या बाता? विषाणू हेच केवळ सत्य. बाकी सगळे भ्रम. तरीही मानवी प्रजातीवर प्रेम करावे अशीच ती आहे. विषाणूंशी लढा देणारे तिच्याइतकी श्रेष्ठ लढाऊ प्रजाती या पृथ्वीतलावर आणखी दुसरी नाही. "
या कादंबरीतील वरील विचार कादंबरीला अभिजातता प्रदान करतात. लेखक हा द्रष्टा असतो. भूत, वर्तमान आणि भविष्य या त्रिकलाचे दर्शन लेखक घडवत असतो. प्रस्तुत कादंबरीत त्रिकालाचे अत्यंत सम्यक चित्रण आलेले आहे. प्रस्तुत कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते. ते म्हणजे कादंबरीतील अनेक घटना प्रसंगांच्या निमित्ताने लेखक अत्यंत कमी शब्दात तात्विक, दार्शनिक विचार मांडतो. उदाहरणार्थ - 'पटत नसलेली गोष्ट सारखी करत राहणं हे रोज डोक्याला खिळा ठोकून घेण्यासारखे आहे '. पृष्ठ ८४, 'जिंकणारा आणि हरणारा यांच्यात अगदी थोडं अंतर असतं. ' पृष्ट ९९ , 'फौजीला जात नसते '. पृष्ठ ३७९, 'जीवन आपल्या आकलनाच्या पलीकडे असते '. पृष्ठ ५९७, 'ज्याच्याजवळ बळ आणि विद्या त्याने राज्य करावे ' पृष्ट ५४२, ' सत्य नेहमी तापदायक असते. आणि ते सहसा राहाटीला धरून नसते ' पृष्ट५४८, 'आपल्याला काय हवे हे वेळीच कळणे आणि ते करायला मिळणे यात जगण्याचे सर्वश्रेष्ठ सुख असते'. पृष्ठ६७९ , 'आयुष्यात कर्तबगारीचे काही जमत नसेल तर अशी पूर्वजांची महती माणसाच्या जगण्याला भावनिक बळ पुरवत असते '. पृष्ट६८६, 'कुतूहल असणे आणि त्याची पूर्ती करण्यासाठी धडपडणे यात आपल्या मानवीपणाचे सार दडलेले आहे'. पृष्ट७०८, 'लिहिणे हे ऐकीव गोष्टींवरून रचणे नसते. ते त्या गोष्टींना आपल्या आत घेऊन आपल्या असण्याचा भाग बनवून आपले करून रचणे असते'. पुष्ट७१३, ' ज्याला आरंभ असतो त्याला अंतही असतोच ' पृष्ट७४०, 'कुणबी मातला आणि मराठा झाला ' पृष्ट७६५ यासारखी कितीतरी वाक्ये या महाकादंबरीत आहेत. गेम्स ऑफ थ्रोन वेबसीरजचा अनुभव देणारी ही कलाकृती आहे. यातील तात्विक मांडणी कलाकृतीला अभिजातता प्रदान करते.
॥ ४ ॥
इतिहासातील घटना,व्यक्ती, वर्ष, स्थळ, काळ यातून कादंबरीतील जीवन जिवंत होते. लेखकाचे इतिहासाचे आकलन खास त्याचे स्वतःचे आहे. इतिहासाच्या भव्य-दिव्य पटावर आपली पात्रे नगण्य असणार याची जाणीव ठेवून या कादंबरीतील पात्रे लेखक उभी करतो. इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्ती,घटना यांची चित्रातील पार्श्वभूमी सारखा लेखकाने अत्यंत कलात्मकतेने उपयोग केला आहे. इतिहासाची जुजबी आकलन असणाऱ्यालाही ही कादंबरी आनंद देते. लेखकाचे इतिहासाबद्दल यातील संचिताबद्दलचे आकलन, चिंतन या कादंबरीला वाचनीय बनवते. वाचकाची उत्कंठा या महाकाय कादंबरीत कुठेही कमी होत नाही. वाचकाला गुंतवून ठेवणारी कादंबरी आहे. वाचकाच्या मनावर चेटूक करणारी कादंबरी आहे. लेखक म्हणतो, "अधी काळ सांगतो. कारण गोष्टी काळात घडत असतात. माणसांचं आयुष्य सामान्यतः ज्या वेगात वाहतं त्या वेगाच्या नजरेत काळा हा स्थळापासून सुटा,स्वतंत्र आणि सार्वभौम म्हणता येईल असा असतो.त्याच्यावर भूमीचा अधिकार चालत नाही, या अर्थाने तो सार्वभौम. तो त्याच्या मर्जीनेच फक्त वाहतो. गोष्टीला स्थळही आवश्यक असतं. स्थळ आणि काळ यांच्या चार मितींच्या अवकाशात गोष्ट घडत असते. स्थळाच्या तीन मिती आणि काळाची एक, तरीही गोष्टीला नियत करण्यात ही काळाची मिती सर्वात प्रमाथी म्हणून आधी काळ सांगतो. "
वरील लेखकाचे विवेचन प्रत्येक सातपाटलाच्या वृत्तांतामागे आहे. श्रीपतीचा काळा हा १२८९ रामदेवराव जाधवांचा काळ आहे. स्थळ पैठण आणि पैठणपासून जवळच असणारे डोंगरकिनी गाव हा पहिल्या सातपाटलांचा जीवन अवकाश होय. डोंगरकिनी वरून श्रीपती वांबोरीला येतो. या काळात मोठ्या राजकीय घडामोडी पडद्यामागे घडतात. यातून श्रीपतीचा जीवनपट बदलतो. पलायन व प्रवास हे श्रीपतीच्या जीवनाचे प्राक्तन ठरते. दुसरा सातपाटील साहेबराव हा होय.याचा काळ इ.स. १४९० निजामशाहीचा काळ होय. अहमदनगर या प्रदेशातील राजकारणातून साहेबराव आर्यांनासोबत खराडी, पुणे गावाकडे प्रस्थान करतो. तिसरा सातपाटील दशरत याचा काळ इ.स. १७४०पूर्व पेशवाईचा काळ होय.करंजे, सातारा येथे दशरथ सातपाटलाचा विस्तार होतो. चौथा सातपाटील जानराव याचा काळ उत्तर पेशवाईचा इ.स. १८१८ दुसर्या बाजीरावाचा काळ होय. गाव साल्पी जिल्हा अहमदनगर येथे तो रूजण्याचा प्रयत्न करतो. पाचवा सातपाटील रखमजी आणि पिराजी काळ इ.स. सन१८५७ च्या बंडानंतरचा साल्पी गावात सर्व सामान्य माणसासारखे जीवन जगणारे सातपाटील यांचा वृत्तांत कादंबरीत येतो.सहवा सातपाटील शंभूराव याचा काळ इ.स. १९१४ पहिल्या महायुद्धानंतरचा काळ होय. स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झालेला तो काळ होता. एका सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवन शंभूराव जगतो. साल्पी गावाचा विस्तार होतो. बदलत्या काळात सातपाटील घराणे गरीबीच्या खाईत लोटले जाते.शेवटचा सातपाटील देवनाथचा काळा हा१९४७नंतरचा स्वतंत्र भारताचा काळ होय. शेवटचा सातपाटील कोथरूड ,जिल्हा पुणे येथे वास्तव्य करतो. अशा वेगवेगळ्या सातपाटलांच्या स्थळ आणि काळ यांच्या अवकाशात ही कादंबरी आकार घेते. काळ कसा बदल जातो आणि माणसाचे अस्तित्व कसे मिटत जाते. याचा प्रदीर्घ शोध प्रस्तुत कादंबरीत उभा राहतो. या कादंबरीतून सात नायकांबरोबरच वेग वेगळ्या नायिकांचे जीवन चित्रीत होते. यात यमी,रोहीणी, आर्याना ऊर्फ आरेनाबाई, आफिया उर्फ आफूबाई,काळीबाई, उल्फी,तेजबाई भिमाबाई, देऊबाई, अंजी या कादंबरीतील सर्व नायिका वेगवेगळ्या काळात संघर्ष करत जीवन जगतात. किंबहुना सातपाटील घराण्याचा वंश विस्तार करताना या नायिकांची भूमिका महत्त्वाची ठरते. वरील सर्व सातपाटील व त्यांच्या नायिका इतिहासातील घडामोडींमध्ये अत्यंत नगण्य भूमिकेत जीवन जगल्या असतील. म्हणून ही कादंबरी बारावे शतक ते विसाव्या शतकापर्यंतच्या सर्वसामान्य माणसांच्या इतिहासासाची, जगण्याची कादंबरी ठरते. इतका मोठा कालावकाश या कादंबरीतून अत्यंत कलात्मक रीतीने चित्रित झाला आहे. म्हणून ही कलाकृती मराठी कादंबरी विश्वातील एक महत्त्वाची कलाकृती ठरते. सातपाटील कुलवृत्तांत कादंबरीमध्ये स्त्री-पुरुष नात्यातील अनेकविध पदर उलगडत जातात. दुसऱ्याच्या सुखात सुख मानणारी पात्रे या कादंबरीत भेटतात. मूल्यांच्या रक्षणासाठी त्याग करणारी ही माणसं विशेष वाटतात. असाधारण इच्छाशक्तीतून आपल्या भावनांचे दमन आनंदमय करणारे श्रीपती आणि रोहिनी मात्र आपल्याला अंतर्मुख करतात. आरेना आणि साहेबराव यांच्यात सर्मपण दिसते. आरेना शय्येत सुद्धा पुढाकार घेणारी होती. ती ज्ञातास्वाद होती. निस्वार्थी आरेना साहेबरावच्या जीवनाला सुंदर आकार देते. दशरतचा आफिया अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वीकार करते. आफगाणपनाचा त्याग करून ती मराठा होते.पिराजी आणि कोल्हाटी समाजातील उल्फी यांच्यातील नातं हे सर्मपणाचे आहे. जातीपेक्षा स्त्री-पुरुष यांच्यातील सुंदर नातं समजून घेणारी ही पात्रे आहेत. शंभूराव तेजाबाई यांच्यात स्त्री-पुरुष समागमाचा आनंद नसतानाही हे दोघे स्वतःचा संसार फुलवतात. ही जोडी नवरा-बायकोच्या नात्या पलीकडे जाते. उल्फी- अँथनी ब्लॅकस्मिथ, भिमाबाई- क्याप्टन लेसिंग या सर्वच पात्रांमध्ये लौकिक स्त्री- पुरूष नात्यापलीकडील समानतेचे, समजूतदारपणाचे आदिम नातं स्पष्ट करणारी ही कलाकृती आहे.
या कादंबरीतील वरील विचार कादंबरीला अभिजातता प्रदान करतात. लेखक हा द्रष्टा असतो. भूत, वर्तमान आणि भविष्य या त्रिकलाचे दर्शन लेखक घडवत असतो. प्रस्तुत कादंबरीत त्रिकालाचे अत्यंत सम्यक चित्रण आलेले आहे. प्रस्तुत कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते. ते म्हणजे कादंबरीतील अनेक घटना प्रसंगांच्या निमित्ताने लेखक अत्यंत कमी शब्दात तात्विक, दार्शनिक विचार मांडतो. उदाहरणार्थ - 'पटत नसलेली गोष्ट सारखी करत राहणं हे रोज डोक्याला खिळा ठोकून घेण्यासारखे आहे '. पृष्ठ ८४, 'जिंकणारा आणि हरणारा यांच्यात अगदी थोडं अंतर असतं. ' पृष्ट ९९ , 'फौजीला जात नसते '. पृष्ठ ३७९, 'जीवन आपल्या आकलनाच्या पलीकडे असते '. पृष्ठ ५९७, 'ज्याच्याजवळ बळ आणि विद्या त्याने राज्य करावे ' पृष्ट ५४२, ' सत्य नेहमी तापदायक असते. आणि ते सहसा राहाटीला धरून नसते ' पृष्ट५४८, 'आपल्याला काय हवे हे वेळीच कळणे आणि ते करायला मिळणे यात जगण्याचे सर्वश्रेष्ठ सुख असते'. पृष्ठ६७९ , 'आयुष्यात कर्तबगारीचे काही जमत नसेल तर अशी पूर्वजांची महती माणसाच्या जगण्याला भावनिक बळ पुरवत असते '. पृष्ट६८६, 'कुतूहल असणे आणि त्याची पूर्ती करण्यासाठी धडपडणे यात आपल्या मानवीपणाचे सार दडलेले आहे'. पृष्ट७०८, 'लिहिणे हे ऐकीव गोष्टींवरून रचणे नसते. ते त्या गोष्टींना आपल्या आत घेऊन आपल्या असण्याचा भाग बनवून आपले करून रचणे असते'. पुष्ट७१३, ' ज्याला आरंभ असतो त्याला अंतही असतोच ' पृष्ट७४०, 'कुणबी मातला आणि मराठा झाला ' पृष्ट७६५ यासारखी कितीतरी वाक्ये या महाकादंबरीत आहेत. गेम्स ऑफ थ्रोन वेबसीरजचा अनुभव देणारी ही कलाकृती आहे. यातील तात्विक मांडणी कलाकृतीला अभिजातता प्रदान करते.
॥ ४ ॥
इतिहासातील घटना,व्यक्ती, वर्ष, स्थळ, काळ यातून कादंबरीतील जीवन जिवंत होते. लेखकाचे इतिहासाचे आकलन खास त्याचे स्वतःचे आहे. इतिहासाच्या भव्य-दिव्य पटावर आपली पात्रे नगण्य असणार याची जाणीव ठेवून या कादंबरीतील पात्रे लेखक उभी करतो. इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्ती,घटना यांची चित्रातील पार्श्वभूमी सारखा लेखकाने अत्यंत कलात्मकतेने उपयोग केला आहे. इतिहासाची जुजबी आकलन असणाऱ्यालाही ही कादंबरी आनंद देते. लेखकाचे इतिहासाबद्दल यातील संचिताबद्दलचे आकलन, चिंतन या कादंबरीला वाचनीय बनवते. वाचकाची उत्कंठा या महाकाय कादंबरीत कुठेही कमी होत नाही. वाचकाला गुंतवून ठेवणारी कादंबरी आहे. वाचकाच्या मनावर चेटूक करणारी कादंबरी आहे. लेखक म्हणतो, "अधी काळ सांगतो. कारण गोष्टी काळात घडत असतात. माणसांचं आयुष्य सामान्यतः ज्या वेगात वाहतं त्या वेगाच्या नजरेत काळा हा स्थळापासून सुटा,स्वतंत्र आणि सार्वभौम म्हणता येईल असा असतो.त्याच्यावर भूमीचा अधिकार चालत नाही, या अर्थाने तो सार्वभौम. तो त्याच्या मर्जीनेच फक्त वाहतो. गोष्टीला स्थळही आवश्यक असतं. स्थळ आणि काळ यांच्या चार मितींच्या अवकाशात गोष्ट घडत असते. स्थळाच्या तीन मिती आणि काळाची एक, तरीही गोष्टीला नियत करण्यात ही काळाची मिती सर्वात प्रमाथी म्हणून आधी काळ सांगतो. "
वरील लेखकाचे विवेचन प्रत्येक सातपाटलाच्या वृत्तांतामागे आहे. श्रीपतीचा काळा हा १२८९ रामदेवराव जाधवांचा काळ आहे. स्थळ पैठण आणि पैठणपासून जवळच असणारे डोंगरकिनी गाव हा पहिल्या सातपाटलांचा जीवन अवकाश होय. डोंगरकिनी वरून श्रीपती वांबोरीला येतो. या काळात मोठ्या राजकीय घडामोडी पडद्यामागे घडतात. यातून श्रीपतीचा जीवनपट बदलतो. पलायन व प्रवास हे श्रीपतीच्या जीवनाचे प्राक्तन ठरते. दुसरा सातपाटील साहेबराव हा होय.याचा काळ इ.स. १४९० निजामशाहीचा काळ होय. अहमदनगर या प्रदेशातील राजकारणातून साहेबराव आर्यांनासोबत खराडी, पुणे गावाकडे प्रस्थान करतो. तिसरा सातपाटील दशरत याचा काळ इ.स. १७४०पूर्व पेशवाईचा काळ होय.करंजे, सातारा येथे दशरथ सातपाटलाचा विस्तार होतो. चौथा सातपाटील जानराव याचा काळ उत्तर पेशवाईचा इ.स. १८१८ दुसर्या बाजीरावाचा काळ होय. गाव साल्पी जिल्हा अहमदनगर येथे तो रूजण्याचा प्रयत्न करतो. पाचवा सातपाटील रखमजी आणि पिराजी काळ इ.स. सन१८५७ च्या बंडानंतरचा साल्पी गावात सर्व सामान्य माणसासारखे जीवन जगणारे सातपाटील यांचा वृत्तांत कादंबरीत येतो.सहवा सातपाटील शंभूराव याचा काळ इ.स. १९१४ पहिल्या महायुद्धानंतरचा काळ होय. स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झालेला तो काळ होता. एका सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवन शंभूराव जगतो. साल्पी गावाचा विस्तार होतो. बदलत्या काळात सातपाटील घराणे गरीबीच्या खाईत लोटले जाते.शेवटचा सातपाटील देवनाथचा काळा हा१९४७नंतरचा स्वतंत्र भारताचा काळ होय. शेवटचा सातपाटील कोथरूड ,जिल्हा पुणे येथे वास्तव्य करतो. अशा वेगवेगळ्या सातपाटलांच्या स्थळ आणि काळ यांच्या अवकाशात ही कादंबरी आकार घेते. काळ कसा बदल जातो आणि माणसाचे अस्तित्व कसे मिटत जाते. याचा प्रदीर्घ शोध प्रस्तुत कादंबरीत उभा राहतो. या कादंबरीतून सात नायकांबरोबरच वेग वेगळ्या नायिकांचे जीवन चित्रीत होते. यात यमी,रोहीणी, आर्याना ऊर्फ आरेनाबाई, आफिया उर्फ आफूबाई,काळीबाई, उल्फी,तेजबाई भिमाबाई, देऊबाई, अंजी या कादंबरीतील सर्व नायिका वेगवेगळ्या काळात संघर्ष करत जीवन जगतात. किंबहुना सातपाटील घराण्याचा वंश विस्तार करताना या नायिकांची भूमिका महत्त्वाची ठरते. वरील सर्व सातपाटील व त्यांच्या नायिका इतिहासातील घडामोडींमध्ये अत्यंत नगण्य भूमिकेत जीवन जगल्या असतील. म्हणून ही कादंबरी बारावे शतक ते विसाव्या शतकापर्यंतच्या सर्वसामान्य माणसांच्या इतिहासासाची, जगण्याची कादंबरी ठरते. इतका मोठा कालावकाश या कादंबरीतून अत्यंत कलात्मक रीतीने चित्रित झाला आहे. म्हणून ही कलाकृती मराठी कादंबरी विश्वातील एक महत्त्वाची कलाकृती ठरते. सातपाटील कुलवृत्तांत कादंबरीमध्ये स्त्री-पुरुष नात्यातील अनेकविध पदर उलगडत जातात. दुसऱ्याच्या सुखात सुख मानणारी पात्रे या कादंबरीत भेटतात. मूल्यांच्या रक्षणासाठी त्याग करणारी ही माणसं विशेष वाटतात. असाधारण इच्छाशक्तीतून आपल्या भावनांचे दमन आनंदमय करणारे श्रीपती आणि रोहिनी मात्र आपल्याला अंतर्मुख करतात. आरेना आणि साहेबराव यांच्यात सर्मपण दिसते. आरेना शय्येत सुद्धा पुढाकार घेणारी होती. ती ज्ञातास्वाद होती. निस्वार्थी आरेना साहेबरावच्या जीवनाला सुंदर आकार देते. दशरतचा आफिया अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वीकार करते. आफगाणपनाचा त्याग करून ती मराठा होते.पिराजी आणि कोल्हाटी समाजातील उल्फी यांच्यातील नातं हे सर्मपणाचे आहे. जातीपेक्षा स्त्री-पुरुष यांच्यातील सुंदर नातं समजून घेणारी ही पात्रे आहेत. शंभूराव तेजाबाई यांच्यात स्त्री-पुरुष समागमाचा आनंद नसतानाही हे दोघे स्वतःचा संसार फुलवतात. ही जोडी नवरा-बायकोच्या नात्या पलीकडे जाते. उल्फी- अँथनी ब्लॅकस्मिथ, भिमाबाई- क्याप्टन लेसिंग या सर्वच पात्रांमध्ये लौकिक स्त्री- पुरूष नात्यापलीकडील समानतेचे, समजूतदारपणाचे आदिम नातं स्पष्ट करणारी ही कलाकृती आहे.
॥ ५ ॥
सातपाटील कुलवृत्तांत कादंबरीच्या मर्यादा : -
१ .सातपाटील कुलवृत्तांतमध्ये समाजव्यवस्थेचे प्रभावी चित्रण येत नाही. समाजातील वेगवेगळ्या घटकांपेक्षा नायक- नायिकांच्या वर्णनात, शृंगारीक वर्णनात लेखकाने कादंबरीचे काही पाने खर्ची घातली आहेत.
२ .समाजातील जात वास्तव त्या काळातील जातीव्यवस्थेचे सूक्ष्म चित्रण ही कलाकृती करत नाही.
३ .कादंबरीची भाषा पहिल्या सातपाटला पासून ते सातव्या सात पाटलापर्यंत सारखीच आहे. रसिकाचे अनुनय करणारी, रसिकांना शरण जाणारी भाषाशैली लेखकाने वापरली आहे . त्या त्या काळातील शब्दकळा कादंबरीत क्षमतेने उभी राहत नाही. वाचकाला आवडेल असं रसिक अनुनय करणारी भाषा प्रस्तुत कादंबरीत येते .
४ . इतिहास, सांस्कृतिक विश्व, परंपरांचे तकलादू चित्रण या कादंबरीत येते. अत्यंत सूक्ष्मतेने, चिकित्सकपणे हे घटक कादंबरीत उभे राहत नाहीत .
५ . देवनाथचे भावविश्व, कौटुंबिक विश्व कलाकृतीत उभे राहत नाही. देवनाथ सातपाटील हा शेवटचा भाग कादंबरीतील मूळ कथानकापासून वेगळा वाटतो. या भागातील सैद्धांतिक, तात्विक मांडणी पहिल्या सहा भागांपेक्षा वेगळा असल्यामुळे सातवा भाग कादंबरीला चिकटवल्या सारखा वाटतो. तो कादंबरीशी एकरूप वाटत नाही.
६ . साहेबराव -आरेनाबाई ,दशरत आफूबाई या दोन सातपाटलांच्या जीवनप्रवासात साम्य दिसते. तोच तो पणा जाणवतो. कथानकातील साम्य वाचकाला सुमार वाटते.
७ .श्रीपती, साहेबराव, दशरत, जानराव, रखमजी आणि पिराजी, शंभूराव, देवनाथ या सातपाटलांच्या कुलवृत्तांतमध्ये बऱ्याच रिकाम्या जागा राहील्या आहेत याची जाणीव होत राहाते. काही तरी मधले दुवे सुटले आहेत असा भास निर्माण होतो. ही या कादंबरीचे मर्यादा सांगता येते.
८ .या कादंबरीची आणखी एक मर्यादा म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडाला दुय्यम मानले गेले आहे. शिवाजी महाराजांच्या काळात सातपाटील घराण्यातील माणसांच्या अवस्थेचे चित्रण या कादंबरीतून येत नाही. शिवाजी महाराज पूर्व काळ व त्यांच्या नंतरचा काळ यातील भेद, बदललेली मूल्यव्यवस्था, समाजव्यवस्था यांचे चित्रण या कादंबरीतून येत नाही. शिवाजी महाराजांच्या काळापेक्षा पेशवाईच्या उत्तरार्धावर लेखकाने लक्ष केंद्रीत केले आहे.
९ .दशरत सातपाटील या भागांमध्ये पानिपतच्या लढाईचे वर्णन येते. दशरत जखमी होतो.सोहेल खान दशरतला झोरावर समजतो. एवढ्या मोठ्या युद्धात दशरथ झोरावर यांचे समोरा समोर येणे हा योगायोग. ते दोघांचे जुळ्या भावांसारखे असणे. हा कादंबरीतला योगायोग न पटणारा आहे. दशरथचे अफगाणिस्तानला जाऊन आफियाला घेऊन येणे. हे अद्भुतरम्य कादंबरीतील वर्णन वाटते. सातपाटील कुलवृत्तांत ह्या कादंबरीच्या ऐतिहासिक, गंभीर मांडणीला धक्का पोहोचवणारे सुमार लेखन वाटते. कादंबरीच्या मांडणीतील सुमारपणाची जाणीव होते.
१० . काहीतरी भव्य दिव्य लेखन केल्याचा भास ही कादंबरी निर्माण करते.ऐतिहासिक पार्श्वभूमी कादंबरीत येते. लेखकाने ऐतिहासिक मांडणी सूक्ष्मतेपेक्षा ,स्थूलपणे केली आहे.त्यामुळे एका महाकादंबरीकडून सुमार कलाकृतीकडे कादंबरीचा प्रवास होतो.कादंबरीमध्ये कुठेही कलात्मकता अनुभवाला येत नाही. सरळ, साधेपणाने गोष्टीरूपात सांगितलेला इतिहास ,गोष्ट ,कहाणी असं या कादंबरीतील कथनाचे स्वरूप आहे. कलात्मकतेच्या अभावातून येणारे सुमारपण कादंबरीत जाणवते. चोखंदळ वाचकांची निराशा करणारी कादंबरी आहे. सर्वसामान्य वाचकाची उत्कंठा वाढवणारी सुमार शैली लेखकाने या कादंबरीत वापरली आहे.
॥ ६ ॥
समारोप : -
वरील सर्व मर्यादा सातपाटील कुलवृत्तांत कादंबरीच्या मान्य करूनही ही कादंबरी मराठी कादंबरी विश्वातील एक महत्त्वाची कादंबरी ठरते. या कादंबरीच्या लेखनातील जाणीवपूर्वकता लक्षात येते. लेखनातील प्रतिभेबरोबरच चिंतन, अभ्यासातील सातत्य, विषयातील अस्था, गांभीर्य लक्षात येण्यासारखे आहे. इतिहास, इतिहासाची साधने, मानववंशशास्त्र, संस्कृती अभ्यास, भाषाशास्त्राचा अभ्यास या कादंबरीतून सूक्ष्मतेने अभिव्यक्त होतो. ही एका वाचकाला गुंतवून ठेवणारी कलाकृती आहे. लेखकाचे प्रयत्नपूर्वक वाचकांची उत्कंठा शेवटपर्यंत टिकून ठेवण्याचे कसब अत्यंत चांगले आहे. विषयाचा अवकाश मोठा आहे. या व्यापक अवकाशात असणारी गुंतागुंत लेखकाने सहजतेने मांडली आहे. साधी, सोपी भाषाशैली या कादंबरीत आहे. कधी तृतीयपुरुषी तर कधी प्रथमपुरुषी निवेदनाचे अत्यंत सहजतेने उपयोजन केले आहे. मराठी कादंबरी काहीशी आर्वातात सापडली आहे. सातपाटील कुलवृत्तांत या कादंबरीने आशय-विषयाच्या ताजेपणातून मराठी कादंबरीला नवी ऊर्जा दिली आहे. या कादंबरीचे सर्व वाचक, अभ्यासक, समीक्षक स्वागतच करतील असा आशावाद व्यक्त करतो. लेखक रंगनाथ पठारे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !! ! धन्यवाद !!!
कादंबरीचे शीर्षक : - सातपाटील कुलवृत्तांत
लेखक : - रंगनाथ पठारे
प्रकाशन : - शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
पहिली आवृत्ती : - २० जुलै २०१९
पृष्ठसंख्या : - ७९६
मूल्य : - १०००
डॉ. गणपतराव ढेंबरे
मराठी विभाग
श्री .व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर, तालुका रावेर, जिल्हा जळगाव
पिन : -४२५५०८
मोबाईल क्रमांक -९४२१०८१२७०
ई-मेल dhembregr@gmail.com
सातपाटील कुलवृत्तांत कादंबरीच्या मर्यादा : -
१ .सातपाटील कुलवृत्तांतमध्ये समाजव्यवस्थेचे प्रभावी चित्रण येत नाही. समाजातील वेगवेगळ्या घटकांपेक्षा नायक- नायिकांच्या वर्णनात, शृंगारीक वर्णनात लेखकाने कादंबरीचे काही पाने खर्ची घातली आहेत.
२ .समाजातील जात वास्तव त्या काळातील जातीव्यवस्थेचे सूक्ष्म चित्रण ही कलाकृती करत नाही.
३ .कादंबरीची भाषा पहिल्या सातपाटला पासून ते सातव्या सात पाटलापर्यंत सारखीच आहे. रसिकाचे अनुनय करणारी, रसिकांना शरण जाणारी भाषाशैली लेखकाने वापरली आहे . त्या त्या काळातील शब्दकळा कादंबरीत क्षमतेने उभी राहत नाही. वाचकाला आवडेल असं रसिक अनुनय करणारी भाषा प्रस्तुत कादंबरीत येते .
४ . इतिहास, सांस्कृतिक विश्व, परंपरांचे तकलादू चित्रण या कादंबरीत येते. अत्यंत सूक्ष्मतेने, चिकित्सकपणे हे घटक कादंबरीत उभे राहत नाहीत .
५ . देवनाथचे भावविश्व, कौटुंबिक विश्व कलाकृतीत उभे राहत नाही. देवनाथ सातपाटील हा शेवटचा भाग कादंबरीतील मूळ कथानकापासून वेगळा वाटतो. या भागातील सैद्धांतिक, तात्विक मांडणी पहिल्या सहा भागांपेक्षा वेगळा असल्यामुळे सातवा भाग कादंबरीला चिकटवल्या सारखा वाटतो. तो कादंबरीशी एकरूप वाटत नाही.
६ . साहेबराव -आरेनाबाई ,दशरत आफूबाई या दोन सातपाटलांच्या जीवनप्रवासात साम्य दिसते. तोच तो पणा जाणवतो. कथानकातील साम्य वाचकाला सुमार वाटते.
७ .श्रीपती, साहेबराव, दशरत, जानराव, रखमजी आणि पिराजी, शंभूराव, देवनाथ या सातपाटलांच्या कुलवृत्तांतमध्ये बऱ्याच रिकाम्या जागा राहील्या आहेत याची जाणीव होत राहाते. काही तरी मधले दुवे सुटले आहेत असा भास निर्माण होतो. ही या कादंबरीचे मर्यादा सांगता येते.
८ .या कादंबरीची आणखी एक मर्यादा म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडाला दुय्यम मानले गेले आहे. शिवाजी महाराजांच्या काळात सातपाटील घराण्यातील माणसांच्या अवस्थेचे चित्रण या कादंबरीतून येत नाही. शिवाजी महाराज पूर्व काळ व त्यांच्या नंतरचा काळ यातील भेद, बदललेली मूल्यव्यवस्था, समाजव्यवस्था यांचे चित्रण या कादंबरीतून येत नाही. शिवाजी महाराजांच्या काळापेक्षा पेशवाईच्या उत्तरार्धावर लेखकाने लक्ष केंद्रीत केले आहे.
९ .दशरत सातपाटील या भागांमध्ये पानिपतच्या लढाईचे वर्णन येते. दशरत जखमी होतो.सोहेल खान दशरतला झोरावर समजतो. एवढ्या मोठ्या युद्धात दशरथ झोरावर यांचे समोरा समोर येणे हा योगायोग. ते दोघांचे जुळ्या भावांसारखे असणे. हा कादंबरीतला योगायोग न पटणारा आहे. दशरथचे अफगाणिस्तानला जाऊन आफियाला घेऊन येणे. हे अद्भुतरम्य कादंबरीतील वर्णन वाटते. सातपाटील कुलवृत्तांत ह्या कादंबरीच्या ऐतिहासिक, गंभीर मांडणीला धक्का पोहोचवणारे सुमार लेखन वाटते. कादंबरीच्या मांडणीतील सुमारपणाची जाणीव होते.
१० . काहीतरी भव्य दिव्य लेखन केल्याचा भास ही कादंबरी निर्माण करते.ऐतिहासिक पार्श्वभूमी कादंबरीत येते. लेखकाने ऐतिहासिक मांडणी सूक्ष्मतेपेक्षा ,स्थूलपणे केली आहे.त्यामुळे एका महाकादंबरीकडून सुमार कलाकृतीकडे कादंबरीचा प्रवास होतो.कादंबरीमध्ये कुठेही कलात्मकता अनुभवाला येत नाही. सरळ, साधेपणाने गोष्टीरूपात सांगितलेला इतिहास ,गोष्ट ,कहाणी असं या कादंबरीतील कथनाचे स्वरूप आहे. कलात्मकतेच्या अभावातून येणारे सुमारपण कादंबरीत जाणवते. चोखंदळ वाचकांची निराशा करणारी कादंबरी आहे. सर्वसामान्य वाचकाची उत्कंठा वाढवणारी सुमार शैली लेखकाने या कादंबरीत वापरली आहे.
॥ ६ ॥
समारोप : -
वरील सर्व मर्यादा सातपाटील कुलवृत्तांत कादंबरीच्या मान्य करूनही ही कादंबरी मराठी कादंबरी विश्वातील एक महत्त्वाची कादंबरी ठरते. या कादंबरीच्या लेखनातील जाणीवपूर्वकता लक्षात येते. लेखनातील प्रतिभेबरोबरच चिंतन, अभ्यासातील सातत्य, विषयातील अस्था, गांभीर्य लक्षात येण्यासारखे आहे. इतिहास, इतिहासाची साधने, मानववंशशास्त्र, संस्कृती अभ्यास, भाषाशास्त्राचा अभ्यास या कादंबरीतून सूक्ष्मतेने अभिव्यक्त होतो. ही एका वाचकाला गुंतवून ठेवणारी कलाकृती आहे. लेखकाचे प्रयत्नपूर्वक वाचकांची उत्कंठा शेवटपर्यंत टिकून ठेवण्याचे कसब अत्यंत चांगले आहे. विषयाचा अवकाश मोठा आहे. या व्यापक अवकाशात असणारी गुंतागुंत लेखकाने सहजतेने मांडली आहे. साधी, सोपी भाषाशैली या कादंबरीत आहे. कधी तृतीयपुरुषी तर कधी प्रथमपुरुषी निवेदनाचे अत्यंत सहजतेने उपयोजन केले आहे. मराठी कादंबरी काहीशी आर्वातात सापडली आहे. सातपाटील कुलवृत्तांत या कादंबरीने आशय-विषयाच्या ताजेपणातून मराठी कादंबरीला नवी ऊर्जा दिली आहे. या कादंबरीचे सर्व वाचक, अभ्यासक, समीक्षक स्वागतच करतील असा आशावाद व्यक्त करतो. लेखक रंगनाथ पठारे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !! ! धन्यवाद !!!
कादंबरीचे शीर्षक : - सातपाटील कुलवृत्तांत
लेखक : - रंगनाथ पठारे
प्रकाशन : - शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
पहिली आवृत्ती : - २० जुलै २०१९
पृष्ठसंख्या : - ७९६
मूल्य : - १०००
डॉ. गणपतराव ढेंबरे
मराठी विभाग
श्री .व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर, तालुका रावेर, जिल्हा जळगाव
पिन : -४२५५०८
मोबाईल क्रमांक -९४२१०८१२७०
ई-मेल dhembregr@gmail.com